शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

भ्रष्टाचार खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:06 IST

कोल्हापूर : तलाठ्यांनी अंतर्मुख होऊन जनतेची कामे करताना आपले स्वत:चेच काम आहे, असे समजून करावे. वर्षभरात राज्यात तीनशेहून अधिक तलाठी लाचखोरीमुळे निलंबित झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारदर्शकतेबाबत आग्रही आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे दिला. तसेच सातबारा आॅनलाईनचे ...

कोल्हापूर : तलाठ्यांनी अंतर्मुख होऊन जनतेची कामे करताना आपले स्वत:चेच काम आहे, असे समजून करावे. वर्षभरात राज्यात तीनशेहून अधिक तलाठी लाचखोरीमुळे निलंबित झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारदर्शकतेबाबत आग्रही आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे दिला. तसेच सातबारा आॅनलाईनचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून महाराष्टÑ देशात पहिल्या क्रमांकावर नेऊया, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.लोणार वसाहत येथील गणेश हॉल येथे महाराष्टÑ राज्य तलाठी संघाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा व आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती पुणे जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल, सरचिटणीस लक्ष्मीकांत काजे, विभागीय अध्यक्ष बी. बी. काळे, जिल्हाध्यक्ष धनाजी कलिकते, महाराष्टÑ तलाठी, पटवारी, मंडलाधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष शाम जोशी, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार उत्तम दिघे, तहसीलदार चंद्रशेखर सानप आदींची होती.मेळावा व आमसभेचे उद्घाटन महसूलमंत्री पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने झाले.महसूलमंत्री पाटील म्हणाले, आॅनलाईन सात-बाºयाचे काम ६० टक्क्यांपर्यंत झाले असून हे काम फेबु्रवारीपर्यंत पूर्ण करून विजयाची गुढी उभा करूया. भ्रष्टाचार करू नका कारण इथून पुढचा काळ हा प्रामाणिकपणाचा असून सर्वसामान्य माणूस हा प्रामाणिकपणालाच संधी देणार आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात २० तर राज्यात ३०० हून अधिक तलाठी लाचखोरीत निलंबित झाले. त्यासाठी अंतर्मुख होण्याची गरज आहे. त्यामुळे भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. सरकार तलाठ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी व मागण्या मान्य करण्यास बांधील आहे. पुढील महिन्यात महसूलसंदर्भात मुंबईत बैठक घेऊन तलाठी संघाच्या पदाधिकाºयांशी चर्चा करू.एस. चोक्कलिंगम म्हणाले, राज्यातील ७५ तालुक्यांचे व पुणे विभागातील ३०० गावांचे संगणकीकरणाचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील कामासाठी संगणकाची गती वाढविण्यासाठी भारत संचार निगमकडून प्रयत्न होत आहेत. उर्वरित काम फेब्रुवारी-मार्चपर्यंत पूर्ण होईल.ज्ञानदेव डुबल म्हणाले, सातबारा संगणकीकरणाचा प्रकल्प हा शासनासह तलाठ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने पुरेशा सुविधा नसतानाही तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यासाठी सर्व्हरच्या स्पीडसह इतर मागण्या सोडवाव्यात.म्हातारदेव सावंत यांनी स्वागत केले. लक्ष्मीकांत काजे यांनी प्रास्ताविक केले.तलाठी सरकारचे कान अन् डोळेतलाठी हे सरकार व गावचे कान आणि डोळे आहेत. त्यांच्याकडून सरकारला योग्य ती माहिती मिळते. त्यामुळे सरकार नेहमीच त्यांच्याकडे आदराने पाहत आला आहे. संपूर्ण गावाचे माहिती केंद्र म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकार बांधील आहे, असे महसूलमंत्री पाटील यांनी सांगितले.